मराठीमध्ये सर सलामत तो पगडी पचास अशी एक म्हण आहे.याचा साधा अर्थ असा की आपले आरोग्य चांगले असेल तर आपण बरेच काही करू शकतो. मनात खूप काही करायची ऊर्मी असेल पण त्याला शरीराने साथ दिली नाही, तर काही उपयोग नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांसाठीच उत्तम आरोग्य ही महत्वाची गोष्ट आहे. आरोग्य जपणे आणि ते टिकवणे हे आपल्याच हातात आहे. योग्य आहार-विहार आणि काळजी घेतली तर आजार आपल्याला होणारच नाहीत. इतके करुनही व काळजी घेऊनही समजा आपल्याला एखादा रोग/आजार झाला तर वेळीच व योग्य औषधोपचार मिळणेही तितकेच गरजेचे असते.
शहरात किंवा मोठ्या गावात विविध पॅथींचे तज्ज्ञ डॉक्टर, अद्ययावत आणि अत्याधुनिक उपचार पद्धतीची रुग्णालये तसेच अन्य तातडीच्या रुग्णसेवा उपलब्ध होऊ शकतात. मात्र हे उपचार रुग्णाला वेळीच मिळणे आवश्यक असते. मोठी शहरे किंवा गावे सोडली तर आजही लहान खेड्यातून डॉक्टर्स व अद्ययावत रुग्णालयांची वानवाच आहे. लहान खेड्यातून कोणी माणूस अत्यवस्थ झाला तर त्याला मोठ्या शहरात उपचारांसाठी हलवावे लागते. त्यात वेळ गेला किंवा वेळेवर उपचार मिळाले नाहीत तर रुग्ण दगावण्याचीही शक्यता असते. राज्य शासन किंवा स्थानिक महापालिका-नगरपालिका यांची नागरिकांना आरोग्य सेवा पुरविण्याची मुख्य जबाबदारी असली तरी सर्व ठिकाणी शासन पुरे पडू शकत नाही. किंवा अनेक वेळा अशा प्रकारचे उपक्रम किंवा प्रकल्प लाल फितीत अडकले किंवा अडकवले जातात. मात्र समाजात अशा काही संस्था आहेत की त्या समाजासाठी काम करत असतात. अशापैकीच एक टिटवाळा येथील क्रिएटीव्ह ग्रूप ही संस्था
टिटवाळा आणि परिसरातील सुमारे ६८ खेडेगावांसाठी, या भागातील नागरिकांसाठी असे एकही सुसज्ज रुग्णालय नाही. हीच बाब लक्षात घेऊन मांडा-टिटवाळा परिसरातील काही तरुणांनी एकत्र येऊन क्रिएटीव्ह ग्रूप ही संस्था स्थापन केली आणि संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून काम सुरु केले. संस्थेतर्फे तज्ज्ञ डॉक्टर्स, एक्सरे, ईसीजी, पॅथॉलॉजी लॅब, औषधांचे दुकान आदी विविघ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. या तरुणांचा मुख्य उद्देश मांडा-टिटवाळा परिसरातील ६८ खेड्यांमधील नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणे हा होता. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. संस्थेचे काम पाहून डोंबिवलीतील प्रमिला दलाल यांनी टिटवाळ्यातील आपली साडेतीन गुंठे जागा संस्थेला दान दिली. संस्थेनेही याच जागेजवळची साडेतीन गुंठ्याची जागा विकत घेतली आणि भव्य रुग्णालय उभे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु झाले. संस्थेतर्फे उभारण्यात येणाऱया या रुग्णालयाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी हिंदुजा रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद लेले, तेथील डॉक्टर्स श्री. डावर, भालेराव तसेच अन्य मंडळींचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे.
हा संपूर्ण प्रकल्प सुमारे दोन ते सव्वादोन कोटी रुपयांचा आहे. टिटवाळा येथील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिराचे विश्वस्त सुभाष जोशी यांनी मंदिरातर्फे एक कोटीची मदत जाहीर केली आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून रुग्णालयाचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. शासकीय पातळीवरुनही या प्रकल्पाला मदत मिळावी, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या संदर्भातील बातम्या काही दिवसांपूर्वी बहुतेक मराठी वृत्तपत्रातून येऊन गेल्या आहेत. त्याचा तसेच कल्याण येथून प्रसिद्ध होणाऱया कल्याण नागरिक या साप्ताहिकाच्या (१७ जून २००९, अंक तिसरा) अंकातील माहितीचा आधार घेतला आहे. महागणपती रुग्णालय प्रकल्पाची माहिती सर्वाना व्हावी, या उद्देशाने ती दिली आहे. क्रिएटीव्ह ग्रूपच्या तरुणांचे हे काम खरोखरच सर्वाना प्रेरणादायक आणि आपल्याही गावासाठी अशा प्रकारचे विधायक व कायमस्वरुपी काम उभे करण्यासाठी स्फूर्ती देणारे आहे. त्यामुळेच माझ्या ब्लॉगवर मी त्याबद्दल लिहिले आहे.
या संदर्भात कोणाला माहिती हवी असेल किंवा काही मदत करायची असेल तर त्यासाठी संपर्क
विक्रांत बापट (संस्थापक क्रिएटीव्ह ग्रूप) ९८२०८७२०८४/ ई-मेल vikrant_creative@yahoo.com
गुरुवार, २५ जून, २००९
बुधवार, २४ जून, २००९
एकटा जीव आत्मचरित्र हाऊसफुल्ल

मराठी रंगभूमीवर विच्छा माझी पुरी करा या नाटताद्वारे नवा इतिहास घडविणारे आणि त्यानंतर मराठी चित्रपटांच्या इतिहासात स्वतची खास शैली निर्माण करून प्रत्येक चित्रपट रौप्यमहोत्सवी करून दाखविणारे अभिनेते-दिग्दर्शक दिवगंत दादा कोंडके यांच्या एकटा जीव या आत्मचरित्रालाही वाचकांचा हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळतो आहे. मुंबईत उद्या २५ जून रोजी होणाऱया एका विशेष कार्यक्रमात या पुस्तकाची सातवी आवृत्ती प्रकाशित होत आहे. चित्रपटविषयक लेखन आणि पत्रकारिता करणाऱया अनिता पाध्ये यांनी या आत्मचरित्राचे शब्दांकन केले आहे.
या पुस्तकाच्या पहिल्या दोन आवृत्या मॅजेस्टिक प्रकाशननाने प्रकाशित केल्या होत्या. त्यानंतरच्या चार आणि गुरुवारी प्रकाशित होणाऱया सातव्या आवृत्तीसह सर्व आवृत्या अनुबंध प्रकाशनने प्रकाशित केल्या आहेत. या पुस्तकाची पहिली आवृत्ती १२ मार्च १९९९ मध्ये तर दुसरी आवृत्ती अवघ्या एका महिन्यात म्हणजे ४ एप्रिल १९९९ मध्ये प्रकाशित झाली होती. त्यानंतर हे पुस्तक न्यायालयीन आणि कायदेशीर लढाईच्या कचाट्यात सापडले होते. न्यायालयाकडून या पुस्तकावर बंदीही घालण्यात आली होती. मात्र अनिता पाध्ये यांनी त्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागून हे पुस्तक २००० या वर्षी न्यायालयाच्या कचाट्यातून सोडवले. त्यामुळे पुस्तकावरील बंदीही उठली आणि त्याच वर्षी पुस्तकाची तिसरी आवृत्तीही प्रकाशित झाली. त्यापुढे दर वर्षी एक या प्रमाणे एकेक आवृत्ती येत राहिली.
दादांचे आयुष्य हे विविध नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले होते. या पुस्तकात त्यांच्या सर्व आयुष्याचा पट उलगडला गेला आहे. हे आत्मचरित्र असूनही दादांनी आपल्या आयुष्यात जे काही घडले त्यापैकी काहीही न लपवता सर्व काही प्रांजळपणे सांगितले आहे. आपल्यातील गुण-दोषांसकट त्यांनी स्वताला वाचकांपुढे सादर केले आहे. त्यांचे हे प्रांजळपण दादांच्या चाहत्यांसकट सर्व वाचक आणि रसिकांना भावल्यामुळेच दहा वर्षात या पुस्तकाची सातवी आवृ्त्ती प्रकाशित होत असल्याचे पाध्ये यांनी सांगितले.
चित्रपटविषयक लेखन आणि पत्रकारिता करत असल्यामुळे दादांशी परिचय होताच. या पुस्तक लेखनाच्या निमित्ताने तो जास्त जवळून झाला. प्रत्यक्ष पुस्तकाचे लेखन करण्यापूर्वी मी जवळपास अकरा महिने दररोज दादांशी बोलून, सर्व माहिती घेत होते. दुपारी ४ ते ९ अशा वेळेत आमची मुलाखत चालायची. आमचे हे सर्व बोलणे ध्वनीमुद्रीत केलेले असून त्याच्या ८० कॅसेट्स माझ्याकडे आहेत. सर्व माहिती घेऊन झाल्यानंतर मी पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली आणि तीन महिन्यांत लेखनाचे काम पूर्ण झाले. पुस्तकातील सर्व लेखन हे दादांच्या शैलीतच केले असल्याचेही पाध्ये म्हणाल्या.
हिंदी आणि गुजराथी भाषेतही या पुस्तकाच्या भाषांतर/ अनुवादासाठी विचारणा करण्यात आली आहे. मात्र त्याबाबत अद्याप निर्णय घेतला नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अनिता पाध्ये यांच्या संपर्कासाठी त्यांचा ई-मेल
anitaapadhye@gmail.com
मंगळवार, २३ जून, २००९
पंढरीची वारी पोहोचली जगभरी!
महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून अव्यातपणे सुरु असलेली पंढरीची वारी म्हणजे भक्तीचा अनोखा अविष्कार आहे. गेल्या काही वर्षांपासून या वारीमध्ये विविध क्षेत्रातील उच्चशिक्षित मंडळी आणि इंटरनेटसॅव्ही व ‘आयटी’ क्षेत्रातील युवकही सहभागी होत आहेत. दरवर्षी पंढरीच्या वारीत सहभागी होणारी ही लाखो माणसे उत्सुकतेचा विषय ठरला आहे. अशाच उत्सुकतेतून आणि आपण घेतलेल्या वारीचा अनुभव लोकांपर्यत पोहोचविण्याच्या उद्देशाने छायाचित्रकार शिरीष शेटे यांनी ‘वारी-पाथ टू दि डिवाइन’ हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक इंग्रजी भाषेत असल्यामुळे पंढरीची वारी आता जगभर पोहोचणार आहे.
ही बातमी २३ जून २००९ च्या लोकसत्ता (मुंबई)च्या अंकात पान तीन वर प्रसिद्ध झाली आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर पुण्यात ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते झाले. शेटे हे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेत मुख्य फोटोग्राफर आहेत. गेली पाच ते सहा वर्षे ते वारी करत आहेत. या पुस्तकात त्यांनी वारीचे अनुभव छायाचित्रे आणि लेखन या स्वरुपात सादर केले आहेत. वारीची परंपरा व इतिहास, वारीची होणारी सुरुवात, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांच्या वारीतील पालख्यांचा सहभाग, दिवेघाटातील वारीचा प्रवास यासह वारीच्या प्रवासातील महत्वाचे मुक्काम, अकलूज व वाखरी येथे होणारे वारीतील रिंगण तसेच अन्य महत्वाच्या नोंदींची सुमारे २०० रंगीत छायाचित्रे या पुस्तकात आहेत. हे पुस्तक ‘स्पेन्टा प्रकाशन’ने प्रकाशित केले आहे.
‘वारी’ या विषयावर मराठीमध्ये बरेच लेखन प्रकाशित झाले असून इंग्रजी भाषेत मात्र या विषयावर फारसे लेखन नाही. त्यामुळे मराठी संस्कृतीमधील गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेचा हा ठेवा मराठी भाषिकांखेरीज अन्य भाषिकांपर्यत तसेच जगभरात पोहोचावा, या उद्देशाने आपण हे लेखन इंग्रजीतून केले असल्याचे शेटे यांनी सांगितले.
शिरीष शेटे यांचा संपर्क
भ्रमणध्वनी-९३२१७१३१४७/ ईमेल shirishgs@gmail.com
शिरीष शेटे यांचे संकेतस्थळ असून त्याचा पत्ता www.shirishshete.com
ही बातमी २३ जून २००९ च्या लोकसत्ता (मुंबई)च्या अंकात पान तीन वर प्रसिद्ध झाली आहे.
या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते तर पुण्यात ज्योतिर्भास्कर जयंतराव साळगावकर यांच्या हस्ते झाले. शेटे हे ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेत मुख्य फोटोग्राफर आहेत. गेली पाच ते सहा वर्षे ते वारी करत आहेत. या पुस्तकात त्यांनी वारीचे अनुभव छायाचित्रे आणि लेखन या स्वरुपात सादर केले आहेत. वारीची परंपरा व इतिहास, वारीची होणारी सुरुवात, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव आदी संतांच्या वारीतील पालख्यांचा सहभाग, दिवेघाटातील वारीचा प्रवास यासह वारीच्या प्रवासातील महत्वाचे मुक्काम, अकलूज व वाखरी येथे होणारे वारीतील रिंगण तसेच अन्य महत्वाच्या नोंदींची सुमारे २०० रंगीत छायाचित्रे या पुस्तकात आहेत. हे पुस्तक ‘स्पेन्टा प्रकाशन’ने प्रकाशित केले आहे.
‘वारी’ या विषयावर मराठीमध्ये बरेच लेखन प्रकाशित झाले असून इंग्रजी भाषेत मात्र या विषयावर फारसे लेखन नाही. त्यामुळे मराठी संस्कृतीमधील गेल्या अनेक वर्षांच्या परंपरेचा हा ठेवा मराठी भाषिकांखेरीज अन्य भाषिकांपर्यत तसेच जगभरात पोहोचावा, या उद्देशाने आपण हे लेखन इंग्रजीतून केले असल्याचे शेटे यांनी सांगितले.
शिरीष शेटे यांचा संपर्क
भ्रमणध्वनी-९३२१७१३१४७/ ईमेल shirishgs@gmail.com
शिरीष शेटे यांचे संकेतस्थळ असून त्याचा पत्ता www.shirishshete.com
रविवार, २१ जून, २००९
आला आला वारा संगे पावसाच्या धारा.
अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने त्रस्त झालेल्या माणसांना शनिवारी झालेल्या पावसाच्या शिडकाव्याने जरा दिलासा मिळाला. मुंबईत मात्र त्याने फक्त वातावरण निर्मिती केली. पण ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि राज्याच्या अन्य भागात मात्र त्याने काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी रिमझिम स्वरुपात आपली हजेरी लावली. दोन दिवसात मान्सून मुंबईसह राज्यात सक्रिय होणार असल्याचा वेधशाळेचा अंदाज आहे. त्यांचा हा अंदाज खरा ठरो आणि काल आलेला हा पाऊस राज्यात चांगला मुक्कामाला राहो, अशी आशा आहे.
पाऊस सुरु झाल्यानंतर सृष्टीचे सर्व रंगरूपच बदलून जाते. उन्हाळ्यात तप्त झालेली धरणी पावसाच्या पहिल्या धारांनी म्हाऊन निघते आणि मन धुंद करणारा मातीचा गंध सर्वत्र दरवळू लागतो. जसजसा पाऊस चढू लागतो, तसतसे आजूबाजूचे सर्व वातावरण हिरवेगार होऊन जाते. हा हिरवा निसर्ग मन मोहून टाकतो, मनाला उत्साह-आनंद देतो. मराठी साहित्य. भावगीते. चित्रपटगीते यातूनही या पावसाचे वर्णन करणारी खूप गाणी आहेत. यापैकी अनेक गाणी लोकप्रिय असून पाऊस सुरु झाली की ही गाणी आपल्या मनात रुंजी घालायला सुरुवात करतात. आपल्याला ती गाणी आठवून आपण ती अगदी सहज गुणगुणायला लागतो.
मराठी साहित्य, भावगीते आणि चित्रपटगीतांमधून आलेला हा पाऊस वेगवेगळी रुपे घेऊन आलेला आहे. कधी तो हळूवारपणे तर कधी धिंगाणा घालत येतो. कधी तो पावसाच्या आठवणींनी आपले मन धुंद करतो तर कधी हाच पाऊस आपले मन व्याकुळ करतो. हाच पाऊस प्रियकर-प्रेयसीला हवाहवासा वाटतो तर कधी हाच पाऊस त्यांना विरहाचे चटके देतो. कधी हाच पाऊस बडबड गाणी होऊन लहान मुलांची गाणी बनून येतो.
पाऊस म्हटला की पटकन ओठावर येते ते देवबाप्पा चित्रपटातील
नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच
हे गाणे. आज इतकी वर्षे झाली तरी हे गाणे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. मराठी वाद्यवृदामध्ये आजही हे गाणे हमखास वन्समोअर घेते. साधे-सोपे शब्द आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल व आशा भोसले यांच्या आवाजाने हे गाणे फक्त लहान मुलांचे न राहता मोठ्यांचेही झाले.
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय
हे असेच एक पावसाचे लोकप्रिय बालगीत. या बरोबरच पटकन आठवणारी पावसाची आणखी बालगीते म्हणजे
ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा तरी चिंब चिंब होऊ दे
किंवा
टप टप टप काय बाहेर वाजताय ते पाहू
चल ग आई, चल ग आई पावसात जाऊ
ही दोन बालगीते आठवतात.
चित्रपटातील पाऊस गाण्यांविषयी बोलताना पटकन आठवणारे एक लोकप्रिय गाणे म्हणजे वरदक्षिणा चित्रपटातील
घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा
मन्ना डे यांनी गायलेले हे गाणे अद्याप लोकप्रिय असून मराठी वाद्यवृंदात आजही हे गाणे नेहमी गायले जाते.
हा खेळ सावल्यांचा य़ा चित्रपटातील
आला आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
हे सुद्धा गाणे पाऊस गाणे म्हणून माहितीचे आहे.
अहो राया मला पावसात नेऊ नका,
ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना
घन ओथंबून येती, मनात राघू फुलती,
वादळ वारं सुटलय गो ,
चिंब पावसांन रान झालं आबादानी
सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांनी अजरामर केलेले
रिमिझम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात
ही सुद्धा अशीच पावसाची काही लोकप्रिय गाणी.
कवयित्री इंदिरा संत यांची
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
अन दारात सायली
ही कविता
किंवा त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांची
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर
क्षणात हिरवे उन पडे
या कविताही सहज आठवणाऱया.
अशी आणखीही अनेक पाऊस गाणी आहेत व असतील. मला सहज आठवली तेवढी मी येथे दिली. अनेक गाणी राहिलीही असतील. ती तूम्ही मनात आठवून आलेल्या या पावसाचे मनापासून स्वागत करा...
पाऊस सुरु झाल्यानंतर सृष्टीचे सर्व रंगरूपच बदलून जाते. उन्हाळ्यात तप्त झालेली धरणी पावसाच्या पहिल्या धारांनी म्हाऊन निघते आणि मन धुंद करणारा मातीचा गंध सर्वत्र दरवळू लागतो. जसजसा पाऊस चढू लागतो, तसतसे आजूबाजूचे सर्व वातावरण हिरवेगार होऊन जाते. हा हिरवा निसर्ग मन मोहून टाकतो, मनाला उत्साह-आनंद देतो. मराठी साहित्य. भावगीते. चित्रपटगीते यातूनही या पावसाचे वर्णन करणारी खूप गाणी आहेत. यापैकी अनेक गाणी लोकप्रिय असून पाऊस सुरु झाली की ही गाणी आपल्या मनात रुंजी घालायला सुरुवात करतात. आपल्याला ती गाणी आठवून आपण ती अगदी सहज गुणगुणायला लागतो.
मराठी साहित्य, भावगीते आणि चित्रपटगीतांमधून आलेला हा पाऊस वेगवेगळी रुपे घेऊन आलेला आहे. कधी तो हळूवारपणे तर कधी धिंगाणा घालत येतो. कधी तो पावसाच्या आठवणींनी आपले मन धुंद करतो तर कधी हाच पाऊस आपले मन व्याकुळ करतो. हाच पाऊस प्रियकर-प्रेयसीला हवाहवासा वाटतो तर कधी हाच पाऊस त्यांना विरहाचे चटके देतो. कधी हाच पाऊस बडबड गाणी होऊन लहान मुलांची गाणी बनून येतो.
पाऊस म्हटला की पटकन ओठावर येते ते देवबाप्पा चित्रपटातील
नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच
हे गाणे. आज इतकी वर्षे झाली तरी हे गाणे आबालवृद्धांमध्ये लोकप्रिय आहे. मराठी वाद्यवृदामध्ये आजही हे गाणे हमखास वन्समोअर घेते. साधे-सोपे शब्द आणि सहज गुणगुणता येईल अशी चाल व आशा भोसले यांच्या आवाजाने हे गाणे फक्त लहान मुलांचे न राहता मोठ्यांचेही झाले.
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय
शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय
हे असेच एक पावसाचे लोकप्रिय बालगीत. या बरोबरच पटकन आठवणारी पावसाची आणखी बालगीते म्हणजे
ए आई मला पावसात जाऊ दे, एकदा तरी चिंब चिंब होऊ दे
किंवा
टप टप टप काय बाहेर वाजताय ते पाहू
चल ग आई, चल ग आई पावसात जाऊ
ही दोन बालगीते आठवतात.
चित्रपटातील पाऊस गाण्यांविषयी बोलताना पटकन आठवणारे एक लोकप्रिय गाणे म्हणजे वरदक्षिणा चित्रपटातील
घनघन माला नभी दाटल्या कोसळती धारा
मन्ना डे यांनी गायलेले हे गाणे अद्याप लोकप्रिय असून मराठी वाद्यवृंदात आजही हे गाणे नेहमी गायले जाते.
हा खेळ सावल्यांचा य़ा चित्रपटातील
आला आला वारा संगे पावसाच्या धारा
पाठवणी करा सया निघाल्या सासुरा
हे सुद्धा गाणे पाऊस गाणे म्हणून माहितीचे आहे.
अहो राया मला पावसात नेऊ नका,
ये रे घना, ये रे घना, न्हाऊ घाल माझ्या मना
घन ओथंबून येती, मनात राघू फुलती,
वादळ वारं सुटलय गो ,
चिंब पावसांन रान झालं आबादानी
सुमन कल्याणपूर यांच्या स्वरांनी अजरामर केलेले
रिमिझम झरती श्रावणधारा, धरतीच्या कलशात
ही सुद्धा अशीच पावसाची काही लोकप्रिय गाणी.
कवयित्री इंदिरा संत यांची
नको नको रे पावसा
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
अन दारात सायली
ही कविता
किंवा त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी यांची
श्रावण मासी हर्ष मानसी
हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर
क्षणात हिरवे उन पडे
या कविताही सहज आठवणाऱया.
अशी आणखीही अनेक पाऊस गाणी आहेत व असतील. मला सहज आठवली तेवढी मी येथे दिली. अनेक गाणी राहिलीही असतील. ती तूम्ही मनात आठवून आलेल्या या पावसाचे मनापासून स्वागत करा...
शनिवार, २० जून, २००९
अखेर पाऊस आला...
गेल्या काही महिन्यांपासून अंगाची काहिली करणाऱया उन्हाळ्याने सर्वजण हैराण झाले होते. कधी एकदा पाऊस सुरु होतोय, त्याकडे सगळे डोळे लावून बसल होते. जून महिन्याची १८/१९ तारीख उलटून गेली तरी पावसाचा पत्ता नसल्यामुळे आता कधी एकदाचा पाऊस येतोय, असे झाले होते. ऐला चक्रीवादळामुळे यंदाच्या वर्षी लवकर दाखल झालेला पाऊस पुढे सक्रीय झालाच नाही. महाराष्ट्रातही पाऊस रत्नागिरीपर्यंत येऊन पोहोचला होता. मात्र तो पुढे सरकत नव्हता. मात्र अखेर आज त्याने आपला रुसवा सोडला आणि मुंबईसह ठाणे परिसरात त्यांने आपली हजेरी लावली. आजच्याच वृत्तपत्रातून येत्या ४८ तासात मान्सून मुंबई व कोकणात दाखल होईल, असे वेधशाळेचे म्हणणे असल्याच्या बातम्या आल्या आहेत.
आजची त्याची हजेरी आणि दिवसभरातील ढगाळ वातावरण, अधूनमधून होणारी पावसाची रिमझिम पाहता, आता पाऊस अगदी नक्की आला असे म्हणायला हरकत नाही. फक्त आता त्याने कुठेही न रेंगाळता वाजत, गाजत आणि गर्जत आपली हजेरी लावावी, अशी अपेक्षा त्रस्त झालेल्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खरेच जवळपास पाच महिन्यांपासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आणि विशेषत शेतकऱयांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊसच न आल्यामुळे केलेली पेरणी वाया जाण्याची वेळ येऊन ठेपली होती. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
माणसाचे मन मोठे विचित्र असते नाही, उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आपणाला कधी एकदा पाऊस सुरु होतोय, याची ओढ लागलेली असते. मात्र तो सुरु झाल्यानंतर त्यांने आपले रौद्र रूप दाखवून दाणादाणा उडवून दिली, सगळीकडे पाणी, चिखल करून टाकला आणि पावसाचे कॅलेंडरवरील महिने संपत आल्यानंतरही त्याचा मुक्काम राहिला तर आपण वैतागतो. पावसाला शिव्या घालतो. आता पुरे कर असे म्हणतो. पावासाळ्यानंतर आपल्याला ओढ लागते ती थंडीची. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापासून थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. पण गेल्या वर्षी थंडीच पंडली नाही. ग्लोबल वॉर्मिंग, ढासळते पर्यावरण, वाढते प्रदूषण आणि अन्य काही कारणांमुळे ऋतुचक्रात हे बदल होत आहेत. होणारे हे बदल पाहता असे वाटते की यापुढे कदाचित दहा महिने उन्हाळा आणि दोन महिने पावसाळा असे दोनच ऋतू कदाचित असतील.
खरोखर आपण भारतीय किती सुखी आहोत नाही, आपल्याला पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीनही ऋतूंचा आनंद घेता येतोय, नव्हे आजवर आपण घेत आलो आहोत. उन्हाळ्याने तप्त झालेल्या धरित्रीसह सर्व पशू-पक्षी आणि माणसालाही पावसाचे वेध लागतात. पहिला पाऊस, मातीचा तो मन धुंद व प्रसन्न करणारा गंध, बहरलेली झाडे, सर्वत्र पसरलेली हिरवाई सारे काही आपल्याला हवेहवेसे वाटते. त्यानंतर हिवाळा येतो. पावसाळा नुकताच संपत आलेला असतो. वातावरणातील बदल आपल्याला कळत असतात. थंडीची चाहूल लागताना तयार झालेली पिके आणि त्याचा येणारा विशिष्ट गंध आता हिवाळा सुरु होणार, त्याची जाणीव करून देतो. त्यानंतर उन्हाळा येतो. मला स्वताला सगळ्यात जास्त हिवाळा, त्यानंतर पावसाळा व शेवटी उन्हाळा आवडतो.
आत्ता कुठे पावसाची चाहूल लागली आहे. एकदा का तो धबाधबा कोसळायला लागला की पावसाळी पिकनीक, ट्रेक्स आणि अन्य पावसाळी कार्यक्रमांना सुरुवात होईल. बाहेर मस्त पाऊस पडत असताना गरम गरम कांदा भजी व गवती चहाची पाती किंवा आले घालून केलेल्या वाफाळत्या चहाचे घुटके घेण्यातील मजा काही और असते. प्रेमीजनांच्या मनातही हा पाऊस रुंजी घालतो. त्यांना वेगळ्या वातावरणात घेऊन जातो. आता पुन्हा एकदा ही सर्व धमाल सुरु होईल.
चला , पाऊस आल्याचा आनंद साजरा करु या, हो पण तो साजरा करताना भान ठेवा, आपला तोल जाऊ देऊ नका, क्षणिक मजेसाठी आयुष्य पणाला लावू नका...
आजची त्याची हजेरी आणि दिवसभरातील ढगाळ वातावरण, अधूनमधून होणारी पावसाची रिमझिम पाहता, आता पाऊस अगदी नक्की आला असे म्हणायला हरकत नाही. फक्त आता त्याने कुठेही न रेंगाळता वाजत, गाजत आणि गर्जत आपली हजेरी लावावी, अशी अपेक्षा त्रस्त झालेल्या नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. खरेच जवळपास पाच महिन्यांपासून उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांना आणि विशेषत शेतकऱयांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊसच न आल्यामुळे केलेली पेरणी वाया जाण्याची वेळ येऊन ठेपली होती. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱयांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
माणसाचे मन मोठे विचित्र असते नाही, उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या आपणाला कधी एकदा पाऊस सुरु होतोय, याची ओढ लागलेली असते. मात्र तो सुरु झाल्यानंतर त्यांने आपले रौद्र रूप दाखवून दाणादाणा उडवून दिली, सगळीकडे पाणी, चिखल करून टाकला आणि पावसाचे कॅलेंडरवरील महिने संपत आल्यानंतरही त्याचा मुक्काम राहिला तर आपण वैतागतो. पावसाला शिव्या घालतो. आता पुरे कर असे म्हणतो. पावासाळ्यानंतर आपल्याला ओढ लागते ती थंडीची. ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यापासून थंडीची चाहूल लागायला सुरुवात होते. पण गेल्या वर्षी थंडीच पंडली नाही. ग्लोबल वॉर्मिंग, ढासळते पर्यावरण, वाढते प्रदूषण आणि अन्य काही कारणांमुळे ऋतुचक्रात हे बदल होत आहेत. होणारे हे बदल पाहता असे वाटते की यापुढे कदाचित दहा महिने उन्हाळा आणि दोन महिने पावसाळा असे दोनच ऋतू कदाचित असतील.
खरोखर आपण भारतीय किती सुखी आहोत नाही, आपल्याला पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा अशा तीनही ऋतूंचा आनंद घेता येतोय, नव्हे आजवर आपण घेत आलो आहोत. उन्हाळ्याने तप्त झालेल्या धरित्रीसह सर्व पशू-पक्षी आणि माणसालाही पावसाचे वेध लागतात. पहिला पाऊस, मातीचा तो मन धुंद व प्रसन्न करणारा गंध, बहरलेली झाडे, सर्वत्र पसरलेली हिरवाई सारे काही आपल्याला हवेहवेसे वाटते. त्यानंतर हिवाळा येतो. पावसाळा नुकताच संपत आलेला असतो. वातावरणातील बदल आपल्याला कळत असतात. थंडीची चाहूल लागताना तयार झालेली पिके आणि त्याचा येणारा विशिष्ट गंध आता हिवाळा सुरु होणार, त्याची जाणीव करून देतो. त्यानंतर उन्हाळा येतो. मला स्वताला सगळ्यात जास्त हिवाळा, त्यानंतर पावसाळा व शेवटी उन्हाळा आवडतो.
आत्ता कुठे पावसाची चाहूल लागली आहे. एकदा का तो धबाधबा कोसळायला लागला की पावसाळी पिकनीक, ट्रेक्स आणि अन्य पावसाळी कार्यक्रमांना सुरुवात होईल. बाहेर मस्त पाऊस पडत असताना गरम गरम कांदा भजी व गवती चहाची पाती किंवा आले घालून केलेल्या वाफाळत्या चहाचे घुटके घेण्यातील मजा काही और असते. प्रेमीजनांच्या मनातही हा पाऊस रुंजी घालतो. त्यांना वेगळ्या वातावरणात घेऊन जातो. आता पुन्हा एकदा ही सर्व धमाल सुरु होईल.
चला , पाऊस आल्याचा आनंद साजरा करु या, हो पण तो साजरा करताना भान ठेवा, आपला तोल जाऊ देऊ नका, क्षणिक मजेसाठी आयुष्य पणाला लावू नका...
शुक्रवार, १९ जून, २००९
तुकोबांचा अभंग आणि तीन माकडांची गोष्ट
महात्मा गांधी यांच्या तीन माकडांची गोष्ट सर्वाना माहिती आहे. या तीन माकडांपैकी एकाने आपल्या कानावर, एकाने डोळ्यांवर तर एकाने तोंडावर हात ठेवलेला आहे. वाईट ऐकू नका, पाहू नका आणि बोलू नका, असा संदेश ती आपल्याला देतात. महात्मा गांधी यांच्या तीन माकडांच्या या गोष्टीचे मूळ कदाचित संत तुकाराम यांच्या एका अभंगात दडलेले असावे, असे अभ्यासकांना वाटते. तुकोबांच्या अभंगावरून महत्माजींना स्फुरली तीन माकडांची गोष्ट अशी शेखर जोशी यांची बातमी लोकसत्ताच्या (१७ जून २००९) च्या अंकात पान क्रमांक २ वर प्रसिद्ध झाली आहे.
महात्मा गांधी १५ ते २८ ऑक्टोबर १९३० या कालावधीत पुण्यातील येरवडा कारागृहात होते. कारागृहातील या कालावधीत त्यांनी तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांपैकी निवडक १६ अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला होता. या अनुवादित अभंगांमध्ये,
पापाची वासना नको दावू डोळा
त्याहूनी आंधळा बराच मी
निंदेचे श्रवण नको माझे कानी
बधीर करोनी ठेवी देवा
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा
त्याहूनी मुका बराच मी
नको मज कधी परस्त्रीसंगती
जनातून माती उठता भली
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा
तू ऐक गोपाळा आवडीसी
हा अभंगही असून तो महात्मा गांधी यांचा आवडता होता. त्यामुळे तीन माकडांच्या गोष्टीची प्रेरणा गांधीजींना या अभंगापासून मिळाली असावी, असे जाणकार व अभ्यासकांना वाटते. एका प्रार्थनासभेच्या प्रसंगी महात्मा गांधी यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना अभंग म्हणण्याची विनंती केली होती. त्यावेळी खेर यांनी गांधीजींना आवडणारा हाच अभंग म्हटला होता, अशी आठवण ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे समन्वयक दिलीप धोंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितली, असल्याचे या बातमीत म्हटले आहे.
संत तुकाराम महाराज यांची ‘अभंगगाथा’www.tukaram.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठीबरोबरच अन्य भारतीय प्रादेशिक भाषेत तसेच इंग्रजीसह अन्य परदेशी भाषांमध्ये जगभरात गेली आहे. महाराष्ट्रातील आठवीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालभारती’च्या इंग्रजी पुस्तकात तुकोबांचे निवडक अभंग अभ्यासाकरिता देण्यात आले असून ते महात्मा गांधी यांनी अनुवादित केलेले आहेत. यंदाच्या वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे हे नवे पाठय़पुस्तक तयार करण्यात आले आहे.
येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधी यांनी ज्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला, त्यात जे का रंजले गांजले, पापाची वासना नको दावू डोळा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, न कळता काय करावा उपाय, मुक्तीपांग नाही विष्णुचिया दासा, काय वाणू आता न पुरे हे वाणी, नाही संतपण मिळते हे हाटी, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, वेद अनंत बोलिला, आणिक दुसरे मज नाही आता, न मिळो कावया न वाढो संतान, महारासी सिवे, कोपे ब्राह्मण तो नव्हे, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, शेवटची विनवणी, संतजन परिसावी, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा आदी अभंगांचा समावेश आहे.
या १६ अभंगांपैकी पाच अभंग इंग्रजीच्या या पाठय़पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासायला देण्यात आले आहेत. यात जे का रंजले गाजले, जेथे जातो तेथे, पुण्य पर उपकार, नाही संतपण मिळत हे हाटी आणि हेची दान देगा देवा आदी अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पापाची वासना नको दावू डोळा’ हा अभंग मात्र या पुस्तकात नसल्याचे या बातमीत म्हटले आहे.
महात्मा गांधी १५ ते २८ ऑक्टोबर १९३० या कालावधीत पुण्यातील येरवडा कारागृहात होते. कारागृहातील या कालावधीत त्यांनी तुकाराम महाराजांच्या अनेक अभंगांपैकी निवडक १६ अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला होता. या अनुवादित अभंगांमध्ये,
पापाची वासना नको दावू डोळा
त्याहूनी आंधळा बराच मी
निंदेचे श्रवण नको माझे कानी
बधीर करोनी ठेवी देवा
अपवित्र वाणी नको माझ्या मुखा
त्याहूनी मुका बराच मी
नको मज कधी परस्त्रीसंगती
जनातून माती उठता भली
तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा
तू ऐक गोपाळा आवडीसी
हा अभंगही असून तो महात्मा गांधी यांचा आवडता होता. त्यामुळे तीन माकडांच्या गोष्टीची प्रेरणा गांधीजींना या अभंगापासून मिळाली असावी, असे जाणकार व अभ्यासकांना वाटते. एका प्रार्थनासभेच्या प्रसंगी महात्मा गांधी यांनी मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांना अभंग म्हणण्याची विनंती केली होती. त्यावेळी खेर यांनी गांधीजींना आवडणारा हाच अभंग म्हटला होता, अशी आठवण ‘तुकाराम डॉट कॉम’ या संकेतस्थळाचे समन्वयक दिलीप धोंडे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितली, असल्याचे या बातमीत म्हटले आहे.
संत तुकाराम महाराज यांची ‘अभंगगाथा’www.tukaram.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठीबरोबरच अन्य भारतीय प्रादेशिक भाषेत तसेच इंग्रजीसह अन्य परदेशी भाषांमध्ये जगभरात गेली आहे. महाराष्ट्रातील आठवीच्या इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी ‘बालभारती’च्या इंग्रजी पुस्तकात तुकोबांचे निवडक अभंग अभ्यासाकरिता देण्यात आले असून ते महात्मा गांधी यांनी अनुवादित केलेले आहेत. यंदाच्या वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीचे हे नवे पाठय़पुस्तक तयार करण्यात आले आहे.
येरवडा कारागृहात असताना महात्मा गांधी यांनी ज्या अभंगांचा इंग्रजी अनुवाद केला, त्यात जे का रंजले गांजले, पापाची वासना नको दावू डोळा, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, न कळता काय करावा उपाय, मुक्तीपांग नाही विष्णुचिया दासा, काय वाणू आता न पुरे हे वाणी, नाही संतपण मिळते हे हाटी, भक्त ऐसे जाणा जे देही उदास, वेद अनंत बोलिला, आणिक दुसरे मज नाही आता, न मिळो कावया न वाढो संतान, महारासी सिवे, कोपे ब्राह्मण तो नव्हे, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा, शेवटची विनवणी, संतजन परिसावी, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा आदी अभंगांचा समावेश आहे.
या १६ अभंगांपैकी पाच अभंग इंग्रजीच्या या पाठय़पुस्तकात विद्यार्थ्यांसाठी अभ्यासायला देण्यात आले आहेत. यात जे का रंजले गाजले, जेथे जातो तेथे, पुण्य पर उपकार, नाही संतपण मिळत हे हाटी आणि हेची दान देगा देवा आदी अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. ‘पापाची वासना नको दावू डोळा’ हा अभंग मात्र या पुस्तकात नसल्याचे या बातमीत म्हटले आहे.
गुरुवार, १८ जून, २००९
शब्दकोश रामदास स्वामी यांच्या साहित्यातील शब्दांचा
महाराष्ट्राच्या संतपरंपरेत समर्थ रामदास स्वामी यांचे अनन्यसाधारण महत्व आहे. बहुतेक संतांनी विठ्ठलाची तर रामदास स्वामी यांनी श्रीराम आणि मारुतीची उपासना जनमानसात रुजवली. केवळ उपासनेवर भर न देता त्यांनी त्याच्याबरोबरच बलोपासनेवर मोठा भर दिला होता. रामदास स्वामी यांनी विपूल ग्रंथलेखन केले. यात मनाचेश्लोक, दासबोध, करुणाष्टके आणि अन्य लेखनाचा समावेश आहे. त्यांनी केलेले लेखन हे आजच्या काळातही मार्गदर्शक व प्रेरणा देणारे आहे. समर्थांच्या या समग्र साहित्यातील शब्दांचा कोश नुकताच प्रकाशित झाला आहे. या कोशात रामदास स्वामी यांच्या साहित्यातील तब्बल अठरा हजार शब्दांचा समावेश करण्यात आला आहे. रामभाऊ नगरकर व डॉ. मुकुंद कानडे या दोघा ज्येष्ठ तरुणांनी हे काम केले आहे. त्यांची वये अनुक्रमे ७६ व ७८ अशी असून या वयातही उत्साहाने आणि जिद्दीने कोशाचे काम त्यांनी पूर्णत्वाला नेले. हा शब्दकोश नुकताच प्रकाशित झाला आहे.
हा शब्दकोश दासबोध वगळून समर्थ रामदास स्वामी यांच्या समग्र साहित्यातील शब्दांचा असून वाचन, संशोधन, मेहनत आणि अन्य संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून नगरकर व डॉ. कानडे यांनी हा कोश संपादित व संकलित केला आहे. या अगोदर नगरकर व कानडे यांनी संत एकनाथ, नामदेव यांच्यावरील कोश तयार केले आहेत.
समर्थ रामदास स्वामी यांच्या समग्र साहित्यातील या कोशात रामदास स्वामी यांच्या साहित्यातील एकही शब्द वगळला गेला नसल्याचा दावा नगरकर यांनी केला. साहित्यातील प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ आणि व्याकरण, शब्दाचा संदर्भ, एकाच शब्दाचे असणारे वेगवेगळे अर्थ, रामदास स्वामी यांच्या साहित्यातील कठीण व समजण्यास अवघड असलेले शब्द व त्यांचा उलगडलेला अर्थही यात देण्यात आला आहे. शब्दकोश तयार करण्यासाठी शंकर देव, ल. रा. पांगारकर, अ. चिं. भट, शं. ना. जोशी आदींच्या ग्रंथांची संदर्भ म्हणून मदत घेण्यात आली आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या साहित्यातून अनेक नवीन शब्द दिले असून त्यातील अनेक शब्द आजही प्रचलित आहेत. पण ते रामदास स्वामी यांनी दिलेले आहेत, हे आपल्याला माहिती नसते. असे अनेक शब्द आम्ही या कोशात दिले आहेत. लोकमान्य हा शब्द आज आपण सर्रास वापरतो, तो रामदास स्वामी यांचा आहे. हा शब्दकोश ५१२ पानांचा असून तो आम्ही दोघांनी प्रकाशित केला असल्याचे नगरकर यांनी सांगितले.
रामदास स्वामी यांच्या साहित्याचे अभ्यासक, मराठी विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी व साहित्यप्रेमी, धार्मिक साहित्यात रुची असणारे वाचक यांच्यासाठी हा शब्दकोश म्हणजे अमूल्य असा संदर्भ ठेवा आहे. नगरकर आणि कानडे यांनी वयाच्या या टप्प्यात केलेले हे काम सर्वानाच प्रेरणादायी आहे.
रामभाऊ नगरकर यांचा संपर्क दूरध्वनी ०२०-२४४९००७७
हा शब्दकोश दासबोध वगळून समर्थ रामदास स्वामी यांच्या समग्र साहित्यातील शब्दांचा असून वाचन, संशोधन, मेहनत आणि अन्य संदर्भ ग्रंथांचा अभ्यास करून नगरकर व डॉ. कानडे यांनी हा कोश संपादित व संकलित केला आहे. या अगोदर नगरकर व कानडे यांनी संत एकनाथ, नामदेव यांच्यावरील कोश तयार केले आहेत.
समर्थ रामदास स्वामी यांच्या समग्र साहित्यातील या कोशात रामदास स्वामी यांच्या साहित्यातील एकही शब्द वगळला गेला नसल्याचा दावा नगरकर यांनी केला. साहित्यातील प्रत्येक शब्द, त्याचा अर्थ आणि व्याकरण, शब्दाचा संदर्भ, एकाच शब्दाचे असणारे वेगवेगळे अर्थ, रामदास स्वामी यांच्या साहित्यातील कठीण व समजण्यास अवघड असलेले शब्द व त्यांचा उलगडलेला अर्थही यात देण्यात आला आहे. शब्दकोश तयार करण्यासाठी शंकर देव, ल. रा. पांगारकर, अ. चिं. भट, शं. ना. जोशी आदींच्या ग्रंथांची संदर्भ म्हणून मदत घेण्यात आली आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या साहित्यातून अनेक नवीन शब्द दिले असून त्यातील अनेक शब्द आजही प्रचलित आहेत. पण ते रामदास स्वामी यांनी दिलेले आहेत, हे आपल्याला माहिती नसते. असे अनेक शब्द आम्ही या कोशात दिले आहेत. लोकमान्य हा शब्द आज आपण सर्रास वापरतो, तो रामदास स्वामी यांचा आहे. हा शब्दकोश ५१२ पानांचा असून तो आम्ही दोघांनी प्रकाशित केला असल्याचे नगरकर यांनी सांगितले.
रामदास स्वामी यांच्या साहित्याचे अभ्यासक, मराठी विषयाचे पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी व साहित्यप्रेमी, धार्मिक साहित्यात रुची असणारे वाचक यांच्यासाठी हा शब्दकोश म्हणजे अमूल्य असा संदर्भ ठेवा आहे. नगरकर आणि कानडे यांनी वयाच्या या टप्प्यात केलेले हे काम सर्वानाच प्रेरणादायी आहे.
रामभाऊ नगरकर यांचा संपर्क दूरध्वनी ०२०-२४४९००७७
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)