सोमवार, ३० मार्च, २००९

हिंदूनो तुम्ही मार खात राहा...

गर्व से कहो हम हिंदू है, कोणी आपल्या गालावर मारले तर दुसरा गाल पुढे न करता गालावर मारणारा तो हातच तोडून टाका, अशी वक्तव्ये केली म्हणून सध्या वरुण गांधी वादात सापडले आहेत. यापूर्वीही हिंदुत्व आणि हिंदूंच्या बाजूने ज्यांनी ज्यांनी आपली भूमिका मांडली त्या सर्व हिंदुत्ववादी मंडळीनाही तथाकथित पुरोगामी आणि धर्मनिरपेक्षवाद्यांच्या टीकेचे प्रहार झेलावे लागले आहेत. (येथे वरुण आणि हिंदुत्ववादाचा पुरस्कार करणाऱयांची तुलना करत नाही) ज्या देशात हिंदू बहुसंख्येने (सध्या तरी पुढचे काय माहीत)आहेत, तेथे बहुसंख्यांकांच्या विरोधात बोलणे ही सध्या फॅशन झाली आहे. कालच एका राष्टवादी नेत्याने मालेगावच्या बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींना अटक केल्यामुळे देशभरातील बॉम्बस्फोट थांबले असल्याचे सांगून समस्त हिंदूंना आरोपीच्या पिंजऱयात उभे केले आहे.जणू मालेगावच्या बॉम्बस्फोटांपूर्वी भारतात अगदी शांतता होती. येथील अहिंदू भारतात गुण्यागोविंदाने नांदत होते. कुठेही बॉम्बस्फोट, धर्म आणि जातीयतेच्या नावाखाली दंगली होत नव्हत्या. उगाचच हिंदुत्ववादी मंडळी गरीब, बिचाऱया मुसलमानांच्या विरोधात बोलत असतात.
१२ मार्च १९९३ चे मुंबईतील बॉम्बस्फोट, त्यानंतर पश्चिम रेल्वेवर घडविण्यात आलेले बॉम्बस्फोट, मशिदीवरून गणपती विसर्जनाची मिरवणूक गेली, ढोल-ताशे वाजवले म्हणून भावना दुखावल्या गेल्या आणि मग येथील काही धर्मांध मंडळींना राहवले नाही आणि त्यांनी त्यांच्या पद्धतीने याला उत्तर दिले.या आणि अशा अनेक गोष्टी गेल्या काही वर्षातील. परंतु गेल्या हजारो वर्षांपासून हिंदुस्थानावर जी परकीय आक्रमणे झाली, येथील संपत्ती लुटून नेली गेली, येथील अनेक वास्तू, देवळे ज्यांनी जमीनदोस्त केल्या, ती मंडळी कोण होती, त्यांचा धर्म काय होता, काहींनी तलवारीच्या जोरावर तर काहींनी पाव किंवा अंडे खायला देऊन मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर केले गेले ते कोणी केले, फाळणीच्या वेळी पाकिस्तानातील हिंदूंवर जे अत्याचार झाले, त्यांना नेसत्या वस्त्रानिशी भारतात परतावे लागले त्याला कोण जबाबदार होते, हे सर्वही येथील हिंदूनीच घडवून आणले असे म्हणायचे आहे का,
आजपर्यंत हिंदूनी फक्त मारच खाल्ला. सहिष्णू म्हणूनच त्यांची आजवर ओळख राहिली आहे. खरे तर आपल्या धर्मातील सर्व देवांच्या हातातही शस्त्रे आहेत, ती काही केवळ शोभेसाठी नाहीत. सर्वसामान्य माणसाच्या सहनशक्तीची मर्यादा संपली की तो ही आक्रमक होतो आणि आपल्यावर अन्याय, अत्याचार करणाऱयाचा बदला घेतो. विशिष्ट जात आणि धर्माचे सर्व लोक वाईट आणि त्यांच्या विरुद्धच हिंदूनी वागले पाहिजे, असा याचा अर्थ नाही. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून जे साचत गेले आहे, ते सहनशक्तीची मर्यादा संपल्यानंतर कुठेतरी उफाळून येणारच ना आणि यालाही गेल्या अनेक वर्षांपासून मुसलमानांचे लांगुनचालन करणारे राजकीय पक्ष आणि राजकारणी मंडळी तसेच सोयीनुसार हिंदुत्वाची भूमिका घेणाऱया आणि सोयीचे नसेल तेव्हा ती सोडून देणाऱया व आपल्याला तथाकथित हिंदुत्ववादी राजकीय पक्ष म्हणवून घेणारी मंडळींही तितकीच जबाबदार आहेत. संसदेवर हल्ला झाल्यानंतर तेव्हा केंद्रात सत्ताधारी असणाऱया रालोआने धमक दाखवून भारतातील काश्मीर आणि अन्य ठिकाणचे दहशतवाद्यांचे तळ का उध्वस्त केले नाहीत, पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या तळांवर का हल्ला केला नाही, हाज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान का बंद केले नाही, आताही कंधहार घडले तर मी दहशतवाद्यांना पुन्हा सुखरुप परत घेऊन जाईन असे म्हणणारे किंवा पाकिस्तानच्या जीनाचे कौतुक करणारे भोंदू हिंदुत्ववादी या सगळ्याला जबाबदार आहेत.
या ठिकाणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वचनाची आठवण होते. हिंदुत्वाची खूण सांगताना ते म्हणतात, देवाचे गुण भक्तात उतरतात. गाईला देव मानता, गाईची पूजा करता करता हिंदूंचे राष्टच्या राष्ट गाय होऊन गेले. त्याने दाती तृण धरले. आता जर कोणाच्या पायावर आपले हे हिंदुत्व उभारायचे असेल तर ते सिंहाच्या पायावरच उभारले पाहिजे. मदोन्मत्त दिग्गजांची गंडस्थाने एका झेपेसारखी फोडून पाडून टाकणारी क्रकच तीक्ष्ण नखे ज्याची आहेत, तो नृसिंह आता पुजला पाहिजे. हिंदुत्वाचे ध्येय ते, खूण ती, गाईचा खूर नव्हे.
तेव्हा आपणच विचार करा, असाच मार खात राहायचे की नृसिंहाची पूजा करायची...

२ टिप्पण्या:

  1. Dear Sir,
    An eye for an eye will make the world blind. -Gandhi. Same old argument from my side. Difference of opinion apart, it is nice to read regular posts on your blog.
    After reading LONDON JOSHI, I felt you are a true Dombiwalikar. It would be a pleasure to read more about your view of Dombiwali. maja yeil vaachayala. - Avadhoot

    उत्तर द्याहटवा
  2. jay maharastra,tumacha saarakha vichar jar pratyekjan karu lagala tar lavakarach hindusthanat hindunche rajya nirman hoil.jay maharastra

    उत्तर द्याहटवा