इंटरनेट म्हणजे खरोखऱच माहितीचे प्रचंड मोठे मायाजाल आहे. यात भ्रमंती करत असताना विविध प्रकारची नवीन माहिती, तर कधी आपल्या समान विचारांचे, आवडीचे मित्रही मिळू शकतात. त्या दिवशी सहजच ऑर्कूटवर (नेमके कुठे ते आठवत नाही) बहुधा चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण किंवा चित्पावन युवा संघ या कम्युनिटीवर अभिजीत बापट या युवकाचे प्रोफाईल वाचले. तो संभाजीराव भिडे यांनी स्थापन केलेल्या श्री शिवप्रतिष्ठानचा सदस्य आहे. ऑर्कूटवर या कम्युनिटीचा ओनर अशी त्याची ओळख आहे. महाराष्ट्रातील समग्र गड, किल्ले आणि दुर्गांची माहिती त्याने उत्तमरित्या संकलित केली आहे. श्री शिवप्रतिष्ठान या कम्युनिटीवर त्याने या प्रश्नांची उत्तरे कधी शोधली का या शीर्षकाखाली काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विविध पुस्तके आणि अन्य माहितीचा संदर्भ घेऊन त्याने संकलित केलेले हे प्रश्न मला पटले. समस्त हिंदूनी त्यावर गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून अभिजीतच्याच परवानगीने हे प्रश्न मी आज माझ्या ब्लॉगवर देत आहे. आपणही त्यावर विचार करा, नुसता विचार करून थांबू नका तर आपल्यातही धर्माभिमान व राष्ट्राभिमान जागवा...
हेच ते प्रश्न...
जगांत एकुण ५२ मुस्लिम देश आहेत. एक तरी मुस्लिम देश 'हज' यात्रेसाठी आपल्या नागरिकांना आर्थिक मदत देतो का ?
मुस्लिमांना भारतांत जे विशेष हक्क दिले गेले आहेत तशा प्रकारचे हक्क कोणत्या एका तरी मुस्लिम देशांत हिंदूंना दिले आहेत का ? भारतांत हिंदू, मुस्लिम वगैरे सर्वधर्मीयांसाठी समान नागरी कायदा (सिव्हील कोड ) कां नाही ?
एकातरी मुस्लिम देशात बिगर मुस्लिम राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान आहे काय ? जगातील एकातरी देशात ८२ टक्के बहुसंख्य धार्मिक समाज, १८ टक्के अल्पसंख्यांक धार्मिक समाजाचे लांगुलचालन व अतिरिक्त लाड करतो काय ? हिंदू बहुसंख्य असलेल्या महाराष्ट्र, बिहार, केरळ, पाँडेचेरी इत्यादीं राज्यात यापूर्वी मुस्लिम मुख्यमंत्री झाले आहेत. मुस्लिम बहुसंख्य जम्मू-काश्मीर वा ख्रिश्चन प्रभाव असलेल्या नागालैंड, मिझोराममधे हिंदू मुख्यमंत्री होण्याची कल्पना तुम्ही करू शकता काय ? हिंदू ८५ टक्के आहेत. हिंदू असहिष्णू असते तर मशिदी व मदरसे फोफावाले असते काय ? मुस्लिम रस्त्यावर नमाज पढू शकले असते काय ? दिवसातून ५ वेळा ध्वनीवर्धकातून 'अल्लाशिवाय दूसरा परमेश्वर नाही' अशी घोषणा देऊ शकले असते काय ?
मुळ भारतातील ३० टक्के प्रदेश मुस्लिमांना पाकिस्तान निर्माण करण्यासाठी दिल्यानंतर हिंदूंना पवित्र असलेल्या अयोध्या, मथुरा व काशीसाठी भीक का मागावी लागते ? भारताचा अविभाज्य भाग असण्याच्या बाबतीत देशातील अन्य राज्यांपेक्षा जम्मू-काश्मीर वेगळा कसा ? गांधीजींनी मंत्रीमंडळाच्या निर्णयाला हरकत घेऊन, सरकारी निधी न वापरता सोमनाथ मंदीर पुनरुद्धारासाठी जनतेचा पैसा वापरावा असा आग्रह का धरला ? व जानेवारी १९४८ मध्ये दिल्लीतील मशिदींच्या पुनरुज्जीवनासाठी सरकारी खजिन्यातील पैसाच वापरावा असे दडपण नेहरू व पटेल यांच्यावर का आणले ? जसे मुस्लिम व ख्रिश्चन महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, बिहार वगैरे ठिकाणी अल्पसंख्य आहेत तसे जम्मू-काश्मीर, मिझोराम नागालैंड, मेघालय येथे हिंदू अल्पसंख्य का नाहीत ? तेथे हिंदूंना अल्पसंख्य अधिकार का नाकारण्यात आले? आपणाला असे वाटते का, की हिंदूंच्या काही समस्या आहेत ? किंवा स्वतःला हिंदू म्हणणे हीच एक समस्या आहे ? गोधरा प्रतिक्रिया अतिरंजीत करण्यात आली, तर काश्मीरमधून ४ लाख हिंदूंचा सफाया केला गेला याबाबत कोणी का बोलत नाही ? १९४७ मधे पाकिस्तान निर्माण केले तेव्हा पाकिस्तानमधे हिंदू २४ टक्के होते. आज एक टक्काही नाहीत. पूर्व पाकिस्तानात १९४७ साली हिंदू ३० टक्के होते, आज बांगलादेशात ७ टक्के हिंदू आहेत. नाहीशा झालेल्या हिंदूंचे काय झाले ? त्यांना व एकंदरीत हिंदूंना मानवाधिकार आहेत का ? अब्दूल रहमान अंतुले यांना प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदीराचे विश्वस्त केले होते, एखादा हिंदू अगदी मुलायमसिंग यादव वा लालूप्रसाद यादव मशिदीचे किंवा मदरशाचे विश्वस्त कधीतरी होऊ शकतील का ? केंद्र सरकार हाज यात्रेसाठी मुस्लिमांना आर्थिक मदत करते. पण हिंदू यात्रेकरूंना कैलास-मानस सरोवर, तिबेट व पशुपतिनाथ-नेपाळ या परदेशातील यात्रांसाठी कोणतीही मदत न करता उलट त्यांच्यावर कर लादणे, त्यांची गैरसोय करणे इ. प्रकार करते हाच भारताचा सर्वधर्म समभाव आहे काय ? केरळ विधानसभेमध्ये काही सदस्य,तसेच तेशील काही खासदार अल्लाह आणि येशू ख्रिस्ताच्या नावाने शपथ घेतात. हे कसे चालते, भारतीय नागरीक जम्मू-काश्मीरमध्ये कायमचे राहू शकत नाहीत असा दुजाभाव का ? चित्र काढणे हे इस्लामला मंजूर नसेल तर एम्. एफ. हुसेन विरुद्ध फतवा का नाही ? तरीपण ते चित्र काढतात, हिंदू देवदेवतांची नग्न चित्र रंगवतात म्हणुन तर हे इस्लामविरोधी मानले जात नाही? जर गाणे बजावणे, नाचणे इस्लामला संमत नसेल (कारण इस्लाम गंभीर विचारांचा धर्म मानला जातो ना !!!!!!!) भारतात मुस्लिम बहुसंख्य झाले तर भारत सर्वधर्मसमानतावादी व लोकशाहीवादी राहील का ? जर दीपावली व कृष्णजन्माष्टमी 'व्हाईट हाऊस' , 'हाऊस ऑफ़ कॉमन्स' व ओस्ट्रेलिया च्या पार्लमेंटमधे' साजरी केली जाते तर भारतीय संसदेत का साजरी केली जात नाही ? आपण अमेरिका इंग्लंड,ओस्ट्रेलियापेक्षा जास्त धर्मनिरपेक्ष आहोत का ? जातीय दंगे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व शिवसेनेमुळे होत असतील तर बांगलादेश, पाकिस्तान, सौदी अरेबिया, इराक़, तुर्कस्तान, अफगानिस्तान, इंडोनेशिया, चेचन्या, चीन, रशिया, फ्रांस, स्पेन, सायप्रस वगैरे मधे तर या संघटना काम करत नाही मग तेथे जातीय दंगे, बॉंम्ब स्फोट का होत आहेत ? अणि ते कोण करत आहेत ? इस्लाम हा जर शांतताप्रिय धर्म असेल तर सगळे अतिरेकी मुस्लिम कसे ? " ईश्वर - अल्ला तेरे नाम " हे वचन एक तरी मुस्लिम मानतो का ? आपणास असे वाटते का, की 'सेक्युलर मुस्लिम' हा शब्द प्रयोग चुकीचा आहे ? व्यक्ती एकतर सेक्युलर किंवा मुस्लिम असू शकते, दोन्ही नाही. मुस्लिम जे फ़क्त त्यांच्या अल्ला या एकाच देवाला मानतात, ते सेक्युलर असू शकतात का ? [ कारण सेक्युलर म्हणजे जे सर्व धर्मातल्या देवाला मानतात ते संयुक्त राष्ट्र संघाच्या मते १० टक्के लोकसंख्या असणाय्रांनाच "अल्पसंख्यांक" म्हणता येईल. तर मग भारतात असणाय्रा १४ ते १८ टक्के मुस्लिमांना अल्पसंख्यांक का म्हटले जाते? (सविस्तर प्रश्न श्री शिवप्रतिष्ठान या कम्युनिटीच्या फोरमवर वाचा)
सध्या देशात जे काही चालले आहे, ते जर डोळे उघडे ठेवून पाहिले तर असे प्रश्न नक्कीच पडतील. अर्थात त्यासाठी डोळ्यांना लावलेली तथाकथीत धर्मनिरपेक्षतेची, पुरोगामीत्वाची झापडे फेकून द्यावी लागतील. शाहबानो प्रकरणी केंद्र शासनाने (तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी) यांनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला, हे लांगुनचालन कोणासाठी व कशासाठी, मुस्लिमांच्या भावना दुखावतात म्हणून शाळांमधून वंदेमातरम वर बंदी, महंमद पैगंबराचे मक्केहून पलायन किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, या वाक्यानी मुस्लिमांच्या भावना दुखावतात म्हणून ती वाक्ये गाळणे, धडे वगळणे, याला काय म्हणायचे
(अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ऑर्कूटवरील श्री शिवप्रतिष्ठान या कम्युनिटीला जरुर भेट द्यावी. संभाजीराव भिडे हे याचे संस्थापक आहेत.)
हे सर्व प्रश्न सुशिक्षित आणि स्वतला सुबुद्ध व बुद्धीवादी म्हणवून घेणाऱयांसाठी नक्कीच विचार करायला लावणारे आहेत. तथाकथीत पुरोगामी, समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱया लोकांकडे या प्रश्नांची उत्तरे आहेत का, की बहुसंख्य हिंदूंच्या विरोधात बोलणे आणि अल्पसंख्यांकांचे विशेषत मुसलमानांचे लांगुनचालन करणे म्हणजेच पुरोगामीत्व का, म्हणजेच सर्वधर्मसमभाव का, की यालाच धर्मनिरपेक्षता म्हणतात.
प्रत्येकाने आपल्या मनाला हे प्रश्न विचारावेत आणि त्याचे प्रामाणिकपणे मनाशीच उत्तर द्यावे.
बुधवार, १३ मे, २००९
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
हे सगळे प्रस्त, लांगुलचालन हे राजकारणी लोक करतात व त्याचे परिणाम सामान्य ८०% जनतेला भोगावे लागत आहेत. हे असे अनेक खदखदणारे प्रश्न गेली पन्नास वर्षे झगडा देत आहेत. पण म्हणतात ना जिथे कुंपणच शेत खातेय तिथे.....
उत्तर द्याहटवाप्रतिक्रियेबद्दल आभार
उत्तर द्याहटवाशेखर जोशी
he sagale mudde BJP ne vaparun fekun dile asa sagalyanana vatat. mazahi tech mat ahe. tyamule hindu ani hindutva yaachi muslimana jitaki chid vatate titakich hindunahi aapalyala badanam kelya jat ahe asa vatate. arthat he maz vaiyaktik mat ahe. tumahi ek patrakar ahat tyamule BJP ch kay chukal he hi tumhi lihav ani shakya asalyas te tyana kalavaav . dhanyavaad
उत्तर द्याहटवाniruttar karaNaare aahet khare he prashna. 'WIKI'var kiva dictionary madhye psuedo-secularizm ya shabdaachaa arth mhaNun he prashna dile jaavet ani jevha jevha e-media madhe psuedo-secularizm ha shabda yeil tyachI link banavun dili gelI pahije.
उत्तर द्याहटवाNakki
उत्तर द्याहटवाkay drishtikon ahe he prashna wicharanya mage? Kharach itake mahatwache
ahet ka he prashna. Wadhat chaleli mahagai, Nete (hindu muslim
christian or any one) yancha wadhat chalela bhrashtachar, globale
warming, plastikcha awastav wapar, kacharyacha gambhir prashna, anna
tanchai, van sanrakshan, wadhati wrukshtod, wij prashna,
shetakari/widyarthi ityadi atmahatya, nalala pani yet nahi, paus padat
nahi, udyachya samajachi apan karun thewaleli tartud ya ani ya sarakhya
dainandin jiwanatil prashnan peksha waril prashna kharach mahatwache
ahet ka? mag apan ka nahi apali patrakaritechi takad ithe kharch karit
... samajat bhed wadhawanare likhan karanya peksha Amacha Sundar Bharat
kasa ghadel yacha ka wichar mandala jat nahi aaj Chin chya wadhatya
kurapati samor sarvach desh hatabal ahet, jar Hindusthanche tukade zale
nasate (Pakistan, bangla) tar aajach super power Bharatach zala asata,
kunachi hinmat navati Bharata chya nadi laganyachi pan apan (kahi
rajyakartyanchya nadi lagun) to diwas apalyapasun adhich dur nela ahe,
ata ahe te tikawanyachi bhasha kara jene karun apali pudhil pidhi tari
sukhani rahil...Jay Hind!