गुरुवार, १४ मे, २००९

योग्य वेळ कधी येणार

कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी निवडणुक प्रचारादरम्यान संसदेवर हल्ला करणाऱया अफजल गुरुबाबत पहिल्यांदा जाहीर विधान केले. इतके दिवस या प्रश्नावर मूग गिळून बसलेल्या कॉंग्रेसने राहुल गांधीच्या मुखातून आपले विचार व्यक्त केले. अफजल गुरु याला योग्य वेळ येताच फाशी दिले जाईल, फाशीची शिक्षा सुनावलेले जे कैदी आहेत, त्यात अफजल गुरुचा २२ वा क्रमांक आहे. अरे वा रे वा, ज्या माणसाने देशाची सार्वभौम असलेल्या संसदेवर हल्ला चढवला, त्याच्यावरील सर्व आरोप निश्चित होऊन सर्वोच्च न्यायालयानेही त्याची फाशी कायम केली, त्या माणसाच्या बाबतीत तु्म्हाला इतका पुळका का, आत्ताच तुम्हाला त्याचा क्रमांक आणि योग्य वेळ याची का आठवण व्हावी, खरे तर आजवर कॉग्रेस मतांच्या राजकारणासाठी कायमच मुस्लिमांचे लांगूनचालन करत आली आहे. या देशात बहुसंख्य हिंदू राहतात, त्यांचाही काही मान-अपमान आहे, हेच ते विसरले आहेत किंवा मुद्दामहून विसरु पाहात आहेत. नियम, कायदा याचा कॉंग्रेसला कसा काय पुळका आला, याचेच आश्चर्य वाटते. नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या पार पडल्या. आजवर मुसमानांचे लांगूचालन करणाऱया कॉंग्रेसने लोकसभा निवडणुकीपूर्वी अफजलला फाशी दिले असते आणि या प्रश्नाचा इश्यू केला असता तर कदाचित त्यांच्या पक्षाला याचा फायदाच झाला असता. परंतू तसे झाले असते तर कॉंग्रेसची परंपरा मोडली गेली असती ना
राहुल गांधी मारे कायदा आणि नियमाच्या गोष्टी करतत आहेत. अफजलचा क्रमांक २२ वा आहे, त्याचा नंबर आल्यावर म्हणजे योग्य वेळ आल्यावर त्याला फाशी देऊ, असे सांगत आहेत, त्याला काहीतरी अर्थ आहे का, हे कोणी बोलावे, अरे तुमच्या वडीलांनी राजीव गांधी यांनी शहाबानो प्रकरणी मुस्लिमांची मते गमवावी लागू नयेत म्हणून, त्यांच्या लांगुनचालनासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल फिरवला, हे तरी लक्षात आहे ना, मग तेथे का नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आदर केला गेला, तेव्हा तुमचा कायदा, प्रथा आणि परंपरा कुठे गेली होती,
राहुल हा सुशिक्षित आहे. आपण राजीव गांधी यांचे पुत्र आहोत, कॉंग्रेस ही आपली वंशपरंपरा आहे, असे समजत असतील, तर डोळ्यांना लावलेली झापडे काढून जरा खरा इतिहास वाचा, तो जाणून घ्या. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कॉंग्रेसने देशाचे राजकीयदृष्ट्या कसे नुकसान केले, त्यावर विचार करा. काश्मीर प्रश्न, चीन व पाकिस्तानचे आक्रमण, देशातील अल्पसंख्यांकांचे त्यातही मुसलमानांचे लांगुनचालन, वाढता दहशतवाद आणि असे अनेक प्रश्न गेल्या साठ वर्षात निर्माण झाले आहेत.
संसदेवर झालेला हल्ला हा देशाच्या मानबिंदूवर झालेला हल्ला समजून त्यावेळी केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्ष आणि रालोआच्या शासनाने पाकिस्तानला कठोर धडा शिकवण्याची गरज होती. परंतु सत्तेवर आल्यानंतर राममंदिराला विसरणाऱया अतिरेक्यांना भारताच्या संरक्षणमंत्र्याची सोबत घेऊन विमानातून सुखरुप पाठवणाऱया भाजपकडून वेगळी अपेक्षा काय करणार, भाजप म्हणजे दुसरी कॉंग्रेस झाली आहे. खऱे तर त्याच वेळी भले या प्रश्नावरून केंद्र सरकार कोसळले, अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा काढून घेतला तरी हरकत नाही पण आम्ही पाकिस्तानला धडकी भरेल, अशी कठोर कारवाई करूनच दाखवू, अशी ठाम भूमिका घ्यायला हवी होती. भारतातील काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांच्या तळांवर बॉम्बहल्ला करून ते उध्वस्त करायला हवे होते. आणि तसे केले असते तरी आंतरराष्ट्रीय व भारतातील जनमतही भाजपला मिळाले असते. समजा या प्रश्नावरून भाजप सरकार कोसळले असते आणि नव्याने निवडणुका घ्याव्या लागल्या असत्या तर भाजपला त्याचा फायदाच झाला असता. पण भाजपनेही शेपुट घातली.
राहल गांधी यांनी मारे अफजल गुरुचा नंबर आला की त्याला फाशी देऊ असे सांगितले. केंद्रात शासन तुमचे आहे. ज्या माणसाने देशाच्या संसदेवर हल्ला केला त्याला फाशी देण्यासाठी नंबर यायची वाट कसली पाहता, अपवाद म्हणून त्याला अगोदर फाशी देता येणार नाही का,समजा या जागी तुमच्या आजी इंदिरा गांधी, वडील राजीव गांधी यांचे मारेकरी असते, त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली असती, शिक्षा सुनावुनही त्याची अंमलबजावणी झाली नसती त्यावेळीही तुम्ही, त्यांचे नंबर आले की त्यांना फाशी देऊ, असे विधान केले असते का की तेव्हा त्यांना वेगळा न्याय लावला असता...

२ टिप्पण्या:

  1. I read all of your blogs today. I like this blog the most along with Hindu. It is great to read. Keep posting.

    Vijay Deshmukh
    South Korea

    उत्तर द्याहटवा
  2. विजय देशमुख
    नमस्कार
    आपण व्यक्त केलेल्या अभिप्रायाबद्दल आभार. आपण माझा ब्लॉग वाचून आवर्जून प्रतिक्रिया कळवली व कौतुक केले, त्यामुळे आनंद वाटला. अशा प्रतिक्रिया लिहिण्याचा हुरुप आणखी वाढवतात. पुन्हा एकदा मनापासून आभार
    शेखर जोशी

    उत्तर द्याहटवा